राज्य सरकारकडून शेतकरी, कामगार आणि इतर घटकांना दिलासा दिला नाही

Devendra Fadnavis alleges that the state government did not provide relief to farmers, workers and other elements

राज्य सरकारकडून शेतकरी, कामगार आणि इतर घटकांना दिलासा दिला नाही – देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी कोणतीही घोषणा केली नाही, कामगार आणि इतर घटकांना दिलासा दिला नाही, अशी टीका विरोधी पक्ष नेतेDevendra Fadnavis Opp Leader  Hadapsar Latest New, Hadapsar News देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

वॉटर ग्रीड संदर्भात सरकारची भूमिका नकारात्मक आहे, इतर राज्यांनी  पेट्रोल आणि डिझेल वरचे कर कमी केले असले तरी राज्य सरकारनं ते कमी केले नाहीत, यावरून आघाडी सरकार दुटप्पी असल्याचं स्पष्ट झालं आहे, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात मांडलेल्या कोणत्याही मुद्द्यावर आपल्या भाषणात उत्तर दिलं नाही, घोटाळे आणि भ्रष्टाचार या विषयावर शेवटपर्यंत कोणीही बोललं नाही, नवाब मलिक यांचं समर्थन करण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे, त्यामुळे आघाडी सरकारचं खरं रूप उघड झालं, असं त्यांनी सांगितलं.

Hadapsar News Bureau

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *