श्रद्धा आणि कर्मयोगाचे मूर्तीमंत रुप काळाने हिरावून नेले आहे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

गजानन महाराज संस्थानाचे शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांना शोक.

शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानाचे विश्वस्तव्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

श्रद्धा आणि कर्मयोगाचे मूर्तीमंत रुप काळाने हिरावून नेले आहेअशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे शोक संदेशात म्हणतातश्री. संत गजानन महाराज यांच्या ज्ञानभक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी शिकवणीवर नितांत श्रद्धा ठेवून शिवशंकरभाऊ जगले. त्यांनी आपल्या कर्मयोगातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही संस्थांची बांधणी केली. त्याद्वारे गोरगरिब आणि वंचितांची सेवाही केली. त्यांच्या निस्वार्थतेचे दाखले हे दंतकथा वाटतील असे पण सत्य आहेत.

श्री. गजानन महाराज संस्थानाची कारभाराचे नियोजनव्यवस्थापन हा जगभरातील तज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय राहीला आहे. त्यांच्या निधनाने सेवा कार्यासाठी आयुष्य वेचलेला कर्मयोगी काळाने हिरावून नेला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *