भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिली क्रिकेट कसोटी: खेळ संपला तेव्हा भारत १६/१, भारताकडे १४६ धावांची आघाडी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिली क्रिकेट कसोटी: खेळ संपला तेव्हा भारत १६/१, भारताकडे १४६ धावांची आघाडी.

Cricket-Image
Image Source Pixabay.com

सेंच्युरियन: पहिल्या क्रिकेट कसोटीत, सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क येथे आज सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी भारताने ६ षटकांत १ बाद १६ धावा करून दक्षिण आफ्रिकेवर १४६धावांची आघाडी घेतली आहे.

पाहुण्या संघाचे खेळावर पूर्ण नियंत्रण आहे, परंतु दुसऱ्या डावात सलामीवीर मयंक अग्रवालला गमावले. भारतीय फलंदाजीतील दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जेन्सनने एकमेव विकेट घेतली.

खेळ संपला तेव्हा के एल राहुल नाबाद ५ आणि शार्दुल ठाकूर ४ धावांवर नाबाद होते. भारताने दक्षिण आफ्रिकेला १९७धावांत गुंडाळत पहिल्या डावात १३०धावांची आघाडी घेतली.

तिसर्‍या दिवशी मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये आज ५ बळी घेत कसोटी क्रिकेट मध्ये २०० बळी पूर्ण केले.

शमीशिवाय जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी दोन तर मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेकडून टेंबा बावुमाने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली.

तत्पूर्वी लुंगी एनगिडीने सहा विकेट घेतल्या. पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताची फलंदाजी कोलमडली. पाहुण्यांनी आज अवघ्या ५५ धावांत ७ विकेट गमावल्या आणि त्यांचा डाव ३२७ धावांत आटोपला.

दिवस 3: – भारत १४६ धावांनी आघाडीवर आहे
भारत दुसरा डाव १६-१ (६ ओव्ह)
राहुल फलंदाजी करत आहे ५
मयंक अग्रवाल सी डी कॉक मार्को जॅनसेन ४
शार्दुल ठाकूरबटिंग ४
अतिरिक्त3 एकूण१६ (१ बाद , ६ ओव्ह)

विकेट १२-१ (मयंक अग्रवाल, ५.१)

गोलंदाज                  ओ  एम  आर  डब्ल्यू
कागिसो रबाडा        ३    ०       ७       ०
लुंगी एनगिडी            २   १        ४        ०
मार्को जॅनसेन            १    ०       ४        १

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *