युवा उद्योजकांना ‘महाराष्ट्र बलस्तंभ’ पुरस्कार प्रदान

Governor presents ‘Maharashtra Bal Stambh Awards’ to young entrepreneurs and achievers

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते युवा उद्योजकांना ‘महाराष्ट्र बलस्तंभ’ पुरस्कार प्रदान

मुंबई  : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटविणाऱ्या युवा उद्योजक व उल्लेखनीय व्यक्तींना ‘महाराष्ट्र बलस्तंभ’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कृषी, पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया, गुंतवणूक, अग्नी सुरक्षा, कला, आदि क्षेत्रातील उद्योजकांचा सत्कार करण्यात आला.

बलस्तंभ पुरस्कार समितीचे मार्गदर्शक माधव भंडारी, संयोजक मनप्रीत सिंह, सहआयोजक डॉ.सुकन्या अय्यर व इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते डॉ.मेघा शर्मा, गौरव गंभीर, भूषण शाह, निशांत मेहता, अनिल घनवट, डॉ.सुधीर मेहता, मनन शाह, आशिष शहा, फाल्गुन दोषी, मयांक गांधी, भरत दाभोळकर व विद्येश तोतरे यांना महाराष्ट्र बलस्तंभ पुरस्कार देण्यात आले.

Hadapsar News Bureau.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *